बोटा गटातील काही गावांमध्ये अनेक वर्षापासुन मोबाईल रेंज मुळे लोक त्रस्त आहेत. मोबाईलला रेंज नसल्या कारणाने अनेक समस्यांना लोकांना सामोरे ज...
बोटा गटातील काही गावांमध्ये अनेक वर्षापासुन मोबाईल रेंज मुळे लोक त्रस्त आहेत. मोबाईलला रेंज नसल्या कारणाने अनेक समस्यांना लोकांना सामोरे जावे लागत आहे. बोटा गटातील प्रामुख्याने पोखरी बाळेश्वर,वरूडी पठार,बोरबन, पिंपळगाव माथा,तळेवाडी,म्हसवंडी गावांना मोबाईल रेंज नसल्यामुळे संवाद साधण्यास अनेक वेळा अडथळे येत आहेत.
वारंवार पाठपुरावा करून देखील अजुन हा प्रश्न सुटलेला नाही. आता महायुतीचे सरकार आल्याने शैलेश भाऊ फटांगरे यांनी पुढाकार घेऊन जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आमदार अमोल भाऊ खताळ व आमदार डॉ किरणजी लहामटे साहेब यांच्या मार्फत लवकरच हा प्रश्न सोडवला जाईल अशी ग्वाही दिलेली आहे.


No comments